२०३० पर्यंत राज्यात ५० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; देशातील पहिल्या 'क्लायमेट वीक'चे मुंबईत उद्घाटन

मुंबई : "राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे", असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.


देशातील पहिल्या 'मुंबई क्लायमेट वीक'चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि जागतिक पर्यावरणातील मान्यवर उपस्थित होते. "हवामान कृतीकडे आम्ही केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची एक मोठी संधी मानतो. जे राज्य हे बदल वेगाने स्वीकारेल, तेच जागतिक भांडवल आणि कौशल्य आकर्षित करू शकेल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


"हवामान बदलाचे संकट हे केवळ पर्यावरणीय आव्हान नसून, भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची ती एक 'किल्ली' आहे. या बदलाचा फटका मुंबईसारख्या किनारी शहरांना आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यामुळे हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे जागतिक नेतृत्व करण्यास महाराष्ट्र आता पूर्णपणे सज्ज आहे," अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्राला अतिरिक्त १ लाख सौर पंप


'पीएम कुसुम' योजनेत महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याचे कौतुक केले. या यशाची दखल घेत त्यांनी महाराष्ट्रासाठी आणखी १ लाख सौर कृषी पंप मंजूर करण्याची घोषणा यावेळी केली. "भारत आर्थिक विकास आणि उत्सर्जन कपात यांची सांगड घालून जगासमोर आदर्श निर्माण करत आहे," असे जोशी म्हणाले.



जागतिक करारांवर स्वाक्षरी


या परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन महत्त्वाचे सामंजस्य करार केले. संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम आणि 'सी-४० सिटीज' या जागतिक संस्थांच्या सोबतीने मुंबईचा 'हवामान अनुकूल आराखडा' तयार केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू

Water Metro: मुंबईच्या समुद्रात ८ मार्गांवर धावणार 'वॉटर मेट्रो' - मंत्री नितेश राणे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

डिसेंबर २०२६ पर्यंत दोन मार्गिका सुरू होणार मुंबई : मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी

Emmanuel Macron India Visit: पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय चर्चेला सुरुवात

मुंबई: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सोमवारी रात्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर प्रथम महिला

Harshvardhan Sapkal : मी तुलना केलीच नव्हती मात्र...अखेर शिवरायांच्या अपमानावरून हर्षवर्धन सपकाळांची माफी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करण्याच्या धाडसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची

अल्पसंख्याक प्रमाणपत्र घोटाळ्यात मंत्रालयातील उपसचिव रडारवर - अनियमितता करणाऱ्यांची गय नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कठोर कारवाईचे संकेत

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यावर शोककळा पसरलेली असताना, मंत्रालयातील अल्पसंख्याक

Ajit Pawar Plane Accident: विमान वाहतूक मंत्रालयाने दिली मोठी अपडेट; घेणार परदेशी तज्ज्ञांची मदत

मुंबई: बुधवार २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले.