Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) १८ फेब्रुवारीपर्यंत ७ राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.


दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, नवीन ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत असून त्याचा परिणाम पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि हिमवृष्टीच्या स्वरूपात दिसून येऊ शकतो. तसेच उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी प्रदेशांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञांच्या मते, या बदलामुळे काही भागांतील तापमानात चढ-उतार होऊ शकतो.


पुढील काही दिवस दिल्ली, एनसीआर, हरियाणा, उत्तरप्रदेश, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये ढगाळ वातावरण, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. देशातील विविध राज्यांतील हवामानाचा अचूक अंदाज स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या अधिकृत माहितीनुसार वेळोवेळी जाहीर केला जाणार आहे.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने