राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; २६ फेब्रुवारीला होणार औपचारिक घोषणा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत या विषयावर तूर्तास पडदा टाकण्यात आला आहे. "विलीनीकरणाच्या संदर्भात तूर्तास कोणतीही चर्चा नको. पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी या विषयावर माध्यमांसमोर कोणतेही भाष्य करू नये," अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. सध्या केवळ पक्ष संघटना वाढवणे आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना नेतृत्वाने दिल्या आहेत.


दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. याच दिवशी पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाईल. या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे.

Comments
Add Comment

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान