दिल्ली: इंडिया विरुद्ध पाकिस्तान (IND VS PAK) यांच्यातील T20 विश्वचषक 2026 सामना रविवार, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत घेत सगळी माहिती दिली आहे. सूर्याने अभिषेक शर्माबाबतची परिस्थिती देखील स्पष्ट केली. पोटाच्या संसर्गामुळे अभिषेक नामिबियाविरुद्धच्या मागील सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकला नाही. तसेत पत्रकार परिषदेत सूर्याने काय म्हटलंय ते जाणून घेऊया.
सूर्याने स्पष्ट केले की, अभिषेक पाकिस्तानविरुद्धच्या टीम इंडियाच्या सामन्यात सहभागी असेल. तसेच त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन टीम इंडियासाठी मोठी प्रेरणा ठरेल.
उस्मान तारिकविरुद्ध टीम इंडियाची तयारी
सूर्या म्हणाला की, भारतीय संघ पाकिस्तानचा गोलंदाज उस्मान तारिकविरुद्ध मॅच खेळताना तयारी शिवाय येऊ शकत नाही, ज्याने त्याच्या अपारंपरिक स्टॉपिंग अॅक्शनने सगळीकडे स्थान मिळवले आहे. सूर्या पुढे म्हणाला की, जरी प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचा असला तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तो एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे, परंतु आपण त्याच्यापुढे शरण जाऊ शकत नाही. आपण सर्वजण खूप उत्साहित आहोत.
भारत-पाकिस्तान सामन्याचा दबाव
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दबावाबद्दल बोलताना सुर्या म्हणाला, "नेहमीच दबाव असतो. भारत-पाकिस्तान सामना हा एक खास प्रसंग असतो. आपण कितीही म्हटले तरी तो फक्त दुसरा सामना आहे, पण दबावाखाली असणे हा मानवी स्वभाव आहे कारण हा सामान्य खेळ नाही. आपण असे सामने वारंवार खेळत नाही. त्यामुळे दबाव नेहमीच असतो."
टॉस दरम्यान हस्तांदोलन (हँडशेक)...
हस्तांदोलनाबद्दल (हँडशेक) चर्चा करताना सुर्याने एक अतिशय मनोरंजक गोष्ट सांगितली आहे. भारतीय कर्णधार म्हणाला की, आपण टॉस दरम्यान हस्तांदोलन पाहू.
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबद्दल बोलताना सुर्या म्हणाला, "ते आमच्या हातात नाही. जेव्हा मी तो निर्णय घेण्याच्या स्थितीत असेन तेव्हा मी तुम्हाला कळवीन."