Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. प्रशासनाकडून सुरक्षा आणि सुव्यवस्थेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे.


देशभरातून भक्त दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिर परिसरात सिंगल बॅरिकेट्सद्वारे नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिरिक्त एसपी अन्नपूर्णा सिंग यांनी सुरक्षा व्यवस्था चोख असल्याची माहिती दिली. तसेच यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.


भारतीय अध्यात्मपरंपरेत भगवान शिव हे संहारक नव्हे तर पुनर्निर्मितीचे प्रतीक मानले जातात. शिवाची उपासना ही केवळ धार्मिक विधी नसून, ती मन, शरीर आणि चेतनेच्या शुद्धीकरणाशी संबंधित एक शास्त्रीय प्रक्रिया आहे.


शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतात. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध अर्पण करण्यामागेही वैज्ञानिक आधार आहे. हे पदार्थ वातावरण शुद्ध करण्यास आणि मनःशांती देण्यास सहाय्यक मानले जातात. शिवाची उपासना म्हणजे अहंकाराचा त्याग, संयमाचे पालन आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याची साधना आहे. त्यामुळे शिवपूजा ही श्रद्धेसोबतच विज्ञानाशी जोडलेली आध्यात्मिक साधना मानली जाते.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या