T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.


श्रीलंकेच्या हवामान विभागाने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तविली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे कोलंबोत पावसाची ९३ टक्के शक्यता आहे. सामन्याच्या वेळेत म्हणजेच संध्याकाळी सात पासून पुढे पावसाची शक्यता फक्त नऊ टक्के आहे. पण संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता ४९ टक्के आहे. तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जर सामन्यावेळी किंवा सामन्याआधी पाऊस पडल्यामुळे सामन्याच्या नियोजनावर परिणाम झाला तर हायव्होल्टेज सामन्याची मजा कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.



सामना रद्द झाल्यासं नुकसान कोणाचं?


पावसामुळे ही मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल? फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही संघांना समान फायदा होईल. कारण दोन्ही टीम्सचे प्रत्येकी ४-४ पॉइंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास १-१ पॉइंट दोघांना मिळेल. म्हणजे दोन्ही टीम्सचे ५-५ पॉइंट होतील. दोन्ही टीम्स सुपर-८ मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीम्सचं नुकसान होईल. USA ची सलग दुसऱ्यांदा सुपर ८ मध्ये पोहोचण्याची संधी हुकेल. नेदरलँड्स आणि USA चे २-२ पॉइंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना बाकी आहे. दोघांनी आपपले सामने जिंकले तर त्यांचे ४-४ पॉइंट होतील. ते पुरेसे नसतील.



USA सुपर-८ मध्ये पोहोचू शकते का?


भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल लागल्यास एक टीम सुपर-८ राऊंडमध्ये पोहोचेल. पण दुसऱ्या टीमला नेदरलँड्स आणि USA शी खेळावं लागेल. नेदरलँड्सचा मार्ग कठीण आहे. कारण त्यांचा शेवटचा सामना भारताशी आहे. तेच USA चा शेवटचा सामना नामीबिया विरुद्ध आहे. १५ फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं आणि नामीबियाने पाकिस्तानला नमवलं आणि USA ने नामीबियाला हरवलं, तर अमेरिकी टीम पुढच्या राऊंडमध्ये पोहोचेल.


भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्डकपसाठी ए ग्रुप अर्थात अ गटामध्ये आहेत. भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी आणि नामिबियाविरुद्धचा सामना ९३ धावांनी जिंकला आहे. दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे भारत चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह गटात अव्वलस्थानी आहे. पाकिस्तानने नेदरलँड विरुद्धचा सामना ३ विकेट राखून आणि अमेरिकेविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकला आहे. हे दोन्ही साखळी सामने जिंकल्यामुळे पाकिस्तान चार गुण आणि +०.९३२ च्या नेट रनरेटसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड