रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले. आनंद सागर यांनी मुंबईत ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून पार्किसन्स या आजारामुळे आनंद सागर त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.


आनंद सागर हे १९८७ मध्ये तयार झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेचे सह निर्माते होते. वडील रामानंद सागर यांच्या पश्चात त्यांचा वारसा आनंद यांनीच समर्थपणे पुढे चालवला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्प केले. एकूण पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या मालिकांची निर्मिती केली. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.


सागर कुटुंबाने आनंद सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ही बातमी कळताच आनंद सागर यांच्या परिचितांपैकी अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सागर कुटुंबाने 'आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत' असे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग