Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीमध्ये; राजकीय घडामोडींना वेग

दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकाच आठवड्यात ते दोनदा दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. तसे घडल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.


काही दिवसांपूर्वीच कोणालाही थांगपत्ता लागून न देता फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस यांचे एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली जाण्यामागील कारण काय, याची चर्चा होऊ लागली होती.



राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट:


मात्र, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळच्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.





सदिच्छा भेट:


देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेले असताना नितीन नवीन यांनी दिल्लीत एका जंगी सोहळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा गुप्त होता. तसेच त्यावेळी नितीन नवीन हेदेखील बिहारच्या दौऱ्यावर होते. परिणामी या दोघांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे कालच्या (१३ फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी नितीन नवीन यांची आवर्जून भेट घेतली. नितीन नवीन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले आहेत. त्यामुळे साहजिकच या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असू शकते. परंतू, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा