काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या विधानावर भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा जो दुर्दैवी व आक्षेपार्ह प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला ते केवळ ऐतिहासिक अज्ञानच नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट घाला आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जबरदस्तीने धर्मांध राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टीपू सुलतानशी करणं म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.


काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या विधानाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या विधानाबद्दल केवळ माफी नव्हे, तर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं


या संदर्भात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. काँग्रेसच्या या विधानाला तुम्ही पाठिंबा देता का? तुमच्या कथित हिंदुत्वाच्या व्याख्येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान बसतो काय? घराबाहेर या, महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभे राहा आणि स्पष्ट उत्तर द्या.


छत्रपती शिवाजी महाराजांबाबत तडजोड, तुलना किंवा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. जो कोणी त्यांच्या तेजस्वी इतिहासाला धक्का देईल, त्याला महाराष्ट्राची जनता योग्य जागा दाखवेल.

Comments
Add Comment

PM MODI : नारी शक्ती वंदन अधिनियमाचा पराभव हा महिलांचा अपमान

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींचे भाषण LIVE नवी दिल्ली : नारी शक्ती वंदन अधिनियम ही १३१ वी घटनादुरुस्ती लोकसभेत

Chitra Wagh : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त करणार, चित्रा वाघ कडाडल्या

नाशिक : महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. तपास पथक आरोपींविरोधात

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर

Rain In Maharashtra : उष्माघातानंतर राज्यासमोर वादळी पावसाचे संकट

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२