Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार


मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ‘अॅम्बुलन्स’ सेवेला तांत्रिक बळ मिळणार असून, नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून दुर्गम भागांपर्यंत आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


या निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासोबतच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील रुग्णवाहिकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवून ती १ हजार ७५६ पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. सध्या महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सेवेत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात २०० रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात येणार असून त्यात दोन ‘एअर अॅम्बुलन्स’ रुग्णवाहिका आणि पाच सागरी रुग्णवाहिकांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट व बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका, नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिका, फर्स्ट रिस्पॉन्डर बाइक तसेच सागरी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश केला जाणार आहे.


१० वर्षांचा करार:


- नवीन रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन उपचारांची परिणामकारकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


- १०८ अंतर्गत आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी १० वर्षांचा करार केला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील आपत्कालीन आरोग्यव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी