Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार


मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ‘अॅम्बुलन्स’ सेवेला तांत्रिक बळ मिळणार असून, नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून दुर्गम भागांपर्यंत आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


या निधीतून नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्यासोबतच अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. अर्थ विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील रुग्णवाहिकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवून ती १ हजार ७५६ पर्यंत नेण्याचे नियोजन आहे. सध्या महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सेवेत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात २०० रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात येणार असून त्यात दोन ‘एअर अॅम्बुलन्स’ रुग्णवाहिका आणि पाच सागरी रुग्णवाहिकांचा समावेश असेल. दुसऱ्या टप्प्यात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट व बेसिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका, नवजात शिशूंसाठी विशेष रुग्णवाहिका, फर्स्ट रिस्पॉन्डर बाइक तसेच सागरी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश केला जाणार आहे.


१० वर्षांचा करार:


- नवीन रुग्णवाहिका मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन उपचारांची परिणामकारकता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


- १०८ अंतर्गत आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी १० वर्षांचा करार केला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील आपत्कालीन आरोग्यव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

Comments
Add Comment

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना

Grishneshwar temple : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे 'गाभारा दर्शन' सुरूच राहणार

वेरूळ : महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाबाबत प्रशासनाने

Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण