T20 World Cup 2026 Ind vs Pak: पाकविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार ? सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं...

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ नामिबिया विरुद्धचा सामना भारताने ९३ धावांनी जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकल्यामुळे भारत ए ग्रुप अर्थात अ गटात चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह अव्वलस्थानी आहे. गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचेही चार गुण आहेत पण त्यांचा नेट रनरेट +०.९३२ आहे. यामुळे रविवारी (१५ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.


अशातच या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना कर्णधार सूर्यकुमार यादव याचा विधानाने चाहत्यांना टेन्शन आलं आहे. सूर्याने नामिबिया विरुद्धच्या टॉस वेळी अभिषेकच्या प्रकृतीची माहिती दिली. तो म्हणाला की; "अभिषेक अजून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्याला अजून दोन-चार मॅच खेळता येणार नाही. त्याच्या जागी संजू सॅमसन खेळेल."


त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच मध्ये चाहत्यांना अभिषेकाची बॅटिंग पाहता येणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवार १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे.

Comments
Add Comment

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर

यूएईच्या कॅनडावरील थरारक विजयाने अफगाणिस्तानवर संकट!

नवी दिल्ली  : कॅनडा विरुद्ध युनायटेड अरब अमिराती यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटातील सामना

टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान मॅचवर पावसाचे सावट

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 WOrld Cup 2026 ZIM vs AUS: झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

श्रीलंका: आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये (T20 WOrld Cup 2026) झिम्बाब्वेने सर्वात मोठा उलटफेर करून ऑस्ट्रेलियाला २३

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

भारताने ओलांडला २०० चा टप्पा, नामिबियाला दिले मोठे आव्हान

नवी दिल्ली : अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू असलेल्या नामिबिया विरुद्धच्या सामन्यात भारताने २० षटकांत नऊ बाद २०९