नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ नामिबिया विरुद्धचा सामना भारताने ९३ धावांनी जिंकला. सलग दोन साखळी सामने जिंकल्यामुळे भारत ए ग्रुप अर्थात अ गटात चार गुण आणि +३.०५० च्या नेट रनरेटसह अव्वलस्थानी आहे. गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानचेही चार गुण आहेत पण त्यांचा नेट रनरेट +०.९३२ आहे. यामुळे रविवारी (१५ फेब्रुवारी) होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
अशातच या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना कर्णधार सूर्यकुमार यादव याचा विधानाने चाहत्यांना टेन्शन आलं आहे. सूर्याने नामिबिया विरुद्धच्या टॉस वेळी अभिषेकच्या प्रकृतीची माहिती दिली. तो म्हणाला की; "अभिषेक अजून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्याला अजून दोन-चार मॅच खेळता येणार नाही. त्याच्या जागी संजू सॅमसन खेळेल."
त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच मध्ये चाहत्यांना अभिषेकाची बॅटिंग पाहता येणार नाही. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवार १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे.