लोणावळातील लायन्स पॉइंट परिसरात पुन्हा आढळला मृतदेह; पोलिस तपास सुरू

लोणावळा : पुण्यातील लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, पण हेच ठिकाण सध्या एकामागोमाग एक घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमुळे हादरून गेले आहे. मागे मुंबईतील कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने या ठिकाणी आत्महत्या केली होती आणि आता लोणावळ्यातील लायन्स पॉइंट परिसरात गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र सिंह (३४) असं मृत तरुणाचं नाव असून तो आयटी कंपनीत कार्यरत होता. पहाटे ४: ३० च्या सुमारास लायन्स पॉइंटजवळ एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहन चालकाचा शोध घेतला असता तिथे कोणीच दिसले नाही, त्यामुळे पोलिसांनी गाडी तपासली त्यात संबंधित मृत व्यक्तीचा फोन सापडला. वीरेंद्र याने आत्महत्या करण्यापूर्वी बायकोला आणि जवळच्या व्यक्तींना ई-मेल आणि मेसेजद्वारे आपण आत्महत्या करणार आहोत याचे संकेत दिले होते. यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला.



स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली


पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेहाचा दरीत शोध घेतला. ज्या ठिकाणी गाडी उभी होती त्याच दिशेने २५० फूट खोल दरीत संबंधित व्यक्ती आढळून आली. शिवदुर्ग टीम आणि वन्यजीव रक्षक मावळ यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असला तरी अधिक कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.


आठवड्याभरात ही दुसरी धक्कादायक घटना घडली त्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे मृत्यूचं ठिकाण तर बनणार नाही ना? याविषयी स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरात घडलेल्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.अश्याच घटना सर्रास घडत असतील तर पर्यटनस्थळांवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.



Comments
Add Comment

Israel Lebanon Ceasefire 2026 : मध्यपूर्वेत १० दिवसांचा युद्धविराम; शांततेकडे मोठं पाऊल, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीत इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला यांच्यात १० दिवसांचा युद्धविराम जाहीर

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Kishori Pednekar : महापौरांचा सन्मान ते बाळासाहेबांचा अवमान

- विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या बाळासाहेबांबद्दल काय आक्षेपार्ह बोलल्या मुंबइ (विशेष

IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त