UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा विचार जपला, त्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्या परभणीने आजवर शिवसेनेच्या भगव्याला भक्कम साथ दिली, त्याच शहरात आता केवळ सत्तेच्या लांगुलचालनासाठी उबाठा गटाने मुस्लिम महापौर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'मुंबईत जर उबाठाची सत्ता आली असती, तर तिथेही बुरखेवालीच महापौर दिसली असती', या भाजपच्या दाव्यावर आता परभणीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.


भाजप मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच देणार, हे स्पष्ट असतानाही उबाठा गटाने मुंबईकरांच्या मनात सातत्याने 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम केले. मात्र, आता त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर देऊन स्वतःचा खरा चेहरा उघड केला आहे. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी शहरात उबाठा गटाने महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांची निवड केली. याउलटज्या काँग्रेसवर लांगुलचालनाचा आरोप होतो, त्यांनी मात्र उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात आणि निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.



बाळासाहेबांना साथ देणारे शहर


परभणी हे शहर नेहमीच हिंदुत्ववादी विचारांशी जोडलेले राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथल्या मतदारांनी सातत्याने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. ज्या शहरात शिवसेनेची वाढच मुळी प्रखर हिंदुत्वाच्या जोरावर झाली, तिथे केवळ राजकीय तडजोडीपोटी मुस्लिम महापौर लादणे, हा सामान्य हिंदू मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.



हिंदू मतदारांमध्ये नाराजीचा सूर


उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी मूळ विचारांना बाजूला सारल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसले आहे. मात्र, परभणीतील या निर्णयाने 'जनाब सेने'चा खरा चेहरा समोर आला आहे. "बाळासाहेबांचे विचार आता फक्त नावालाच उरले असून, प्रत्यक्षात उबाठा गट केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन करत आहे," अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी केली. दरम्यान, उबाठाच्या या निर्णयामुळे परभणीतील हिंदू मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

अलिबाग : गेल्या पाच वर्षांत भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Multi Tunneling Mumbai :मुंबईत उभारणार बोगद्यांचे जाळे ; ४,३९२ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या