UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा विचार जपला, त्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्या परभणीने आजवर शिवसेनेच्या भगव्याला भक्कम साथ दिली, त्याच शहरात आता केवळ सत्तेच्या लांगुलचालनासाठी उबाठा गटाने मुस्लिम महापौर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'मुंबईत जर उबाठाची सत्ता आली असती, तर तिथेही बुरखेवालीच महापौर दिसली असती', या भाजपच्या दाव्यावर आता परभणीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.


भाजप मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच देणार, हे स्पष्ट असतानाही उबाठा गटाने मुंबईकरांच्या मनात सातत्याने 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम केले. मात्र, आता त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर देऊन स्वतःचा खरा चेहरा उघड केला आहे. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी शहरात उबाठा गटाने महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांची निवड केली. याउलटज्या काँग्रेसवर लांगुलचालनाचा आरोप होतो, त्यांनी मात्र उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात आणि निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.



बाळासाहेबांना साथ देणारे शहर


परभणी हे शहर नेहमीच हिंदुत्ववादी विचारांशी जोडलेले राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथल्या मतदारांनी सातत्याने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. ज्या शहरात शिवसेनेची वाढच मुळी प्रखर हिंदुत्वाच्या जोरावर झाली, तिथे केवळ राजकीय तडजोडीपोटी मुस्लिम महापौर लादणे, हा सामान्य हिंदू मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.



हिंदू मतदारांमध्ये नाराजीचा सूर


उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी मूळ विचारांना बाजूला सारल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसले आहे. मात्र, परभणीतील या निर्णयाने 'जनाब सेने'चा खरा चेहरा समोर आला आहे. "बाळासाहेबांचे विचार आता फक्त नावालाच उरले असून, प्रत्यक्षात उबाठा गट केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन करत आहे," अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी केली. दरम्यान, उबाठाच्या या निर्णयामुळे परभणीतील हिंदू मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये