मुंबईतील भायखळ्यात लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

मुंबई: भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये लिफ्ट कोसळली आहे. या लिफ्ट अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी रोजी रात्री भायखळ्यातील जयकृपा टॉवरमधील घोडापदेव क्रॉस लेन क्रमांक १ येथे ही दुर्घटना घडली आहे.


भायखळ्यातील जयकृपा टॉवरमध्ये केबल तुटल्यामुळे लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळली. यानंतर तात्काळ मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बीएमसीचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.


भायखळ्यातील लिफ्ट अपघातात एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमींपैकी तीन जणांना जे.जे. रुग्णालयात, एकाला बालाजी रुग्णालयात तर एकाला जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले. जे. जे रुग्णालयात कल्पिता पवार, यश बालविकर आणि उषा गुप्ता यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. बालाजी रुग्णालयात जमुना प्रसाद शिवहरे तर जसलोक रुग्णालयात शिल्पा मोरे यांच्यावर उपचार केले जात असून त्यांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन