काँग्रेसने पहिल्याच सभागृहात उबाठाचा मीटर केला डाऊन

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षनेता असला प्रत्यक्षात उबाठाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याची संधी दिली नाही. सभागृहात बसण्यास जागा नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर निवडीच्या प्रक्रियेपासूनच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच्या या घोषणाबाजीला उबाठाला बळ देत होते. परंतु काँग्रेसला बळ देतानाच आपलाच मीटर कधी डाऊन कधी टाकला हेच उबाठाला कळले नाही.


मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या विशेष सभेमध्ये काँग्रेसचे २४ नगरसेवक सभागृहात वंदे मातरमचे गीत संपल्यानंतर दाखल झाले. परंतु तोपर्यंत सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवक हे आसनांवर बसलेले होते. त्यामुळे त्यांना बसण्यास जागा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे बसण्यास जागाच नसल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक हे मधल्या रांगेत प्रथम उभे राहत त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या भाषणावेळी महापौरासमोरील जागेमध्ये जावून तिथे उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांना विरोध दर्शवल्यानंतर त्यांना मागे सरायला लागले.त्यानंतर काँग्रेसच्या मेहेरअली हैदरसह काही नगरसेवकांनी सभागृहात जमिनीवर बसण्यास सुरुवात केली. आपले सदस्य जमिनीवर बसल्याचे दाखवून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण खुर्चीवर आणि लाडकी बहिण जमिनीवर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक हे घोषणाबाजी देत होते आणि उपमहापौरांच्या भाषणा दरम्यान गोंधळ निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्या उबाठाचा डावच काँग्रेसने उधळवून लावला. त्यामुळे उबाठाला सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे चित्रच निर्माण करता न आल्यामुळे अखेर उपमहापौरपदाच्या भाषणादरम्यान त्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक घोषणा देत राहिले.


विशेष म्हणजे काँग्रेसने, शिवसेनेला प्रमुख विरोधक होवू न देता प्रमुख विरोधक आपण आहोत हे दाखवण्यासाठी ते उशिरा सभागृहात दाखल झाले आणि बसायला जागा नाही या मुद्दयावरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसने उबाठाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून न स्वीकारता आपणच विरोधी पक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत विरोधी पक्षाची प्रतिमा आणि त्यांचा विरोध झाकोळण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन