Chhatrapati Sambhajinagar Crime: धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरात सहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा वर्गमित्रावर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये चार मुलांनी त्यांच्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी सहावीच्या वर्गात शिकत घेत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये ही घटना घडल्याची माहिती पीडित मुलाच्या पालकांनी दिली. याप्रकरणी चार मुलांविरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. दुसरीकडे, शाळेने मात्र संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पालकांवरच दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे.



हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र शाळेकडून संबंधित मुलांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या वडिलांनी केला. उलट पीडित मुलावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित मुलाच्या वडिलांनी केला.


राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दादा भुसे म्हणाले की, या संदर्भात मी स्वत: माहिती घेणार आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करेन. शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत.


शाळकरी मुलांमध्ये अशा प्रकारची विकृत मानसिकता येते कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मानसोपचार तज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सांगितलं की, "मोबाईलचा अतिवापर, पॉर्न व्हिडीओ पाहणे, एका विशिष्ट विचारसरणीच्या मुलांचा एकत्र ग्रुप होणे, अशा कारणामुळे या घटना घडू शकतात. यावर उपाय म्हणजे पालकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला पाहिजे."


सध्या आरोप असलेल्या चार अल्पवयीन मुलांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत घडणारे असे प्रकार भविष्यात थांबावेत यासाठी शाळा प्रशासन, शिक्षण विभाग काय कारवाई करणार, हे पाहावं लागेल.


Comments
Add Comment

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : पनवेलमध्ये पळस्पे फाटा परिसरात ओएनजीसीच्या सीबीएसई बोर्डाच्या (केंद्रीय विद्यालयाच्या) स्कूल बसला

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान ?

ढाका : बांगलादेशमध्ये २०२४ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना

Vijay Mallya: तुम्हाला भारतात यावेच लागेल, ही तुमची शेवटची संधी; उच्च न्यायालयाने विजय मल्याला बजावले

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (१२ फेब्रुवारी) फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध कडक टिप्पणी

T20 World Cup 2026: 'या' खेळाडूला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात

श्रीलंका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा अनुभवी

UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी

राज्य सरकारचे टाटा ट्रस्ट आणि नाम फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :