आधी हत्या आणि मग मृतदेहासोबत अनेक किलोमीटरचा प्रवास; हवालदाराने केले असे काही....

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेने सामान्य नागरिक आणि चक्क पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका हवालदाराने एका पुरुषाची हत्या करून तब्बल १९१ किलोमीटर प्रवास करून जाळल्याची घटना घडली आहे.

नेमकं घडलं काय ?


नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने सातारा जिल्ह्यात लोणंद परिसरात रागाच्या भरात एका तरुणाची हत्या केली. हवालदाराला आपल्या पत्नीवर संशय आला होता. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचकारणावरून त्या दोघांमध्ये प्रचंड वाद सुरु होते. म्हणून पोलिसाने पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलावून त्याचा काटा काढला. रागाच्या भरात कायद्याचे रक्षण करणाऱ्या हवालदारानेच असे कृत्य केल्याने नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हा कसा उघडकीस आला ?


हत्या केल्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला, कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा १९१ किलोमीटरचा प्रवास केला. ६ फेब्रुवारी रोजी लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचवल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याच्या प्रयत्न केला, मात्र मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला.

सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमुळे हत्येचा छडा


लोणंद पोलिसांनी अत्यंत हुशारीने या तांत्रिक पद्धतींचा आधार घेऊन हत्येचा तपास केला. महामार्गावरील टोलनाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला. तेव्हा ही गाडी मुंबईवरु आल्याचे कळले. संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून पोलिसांनी हवालदार भिसे याला ताब्यात घेतला.
Comments
Add Comment

एन. ए.' परवानगी इतिहासजमा

•बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी •जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज •महसूलमंत्र्यांची जमीन

Nagpur News : नागपूर हादरलं! १२ वीच्या विद्यार्थ्याचा ११ वीच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ काढून धमकी दिली अन् नको नको ते...

नागपूर : शिक्षण आणि परीक्षेचे वय असलेल्या तरुणांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याची धक्कादायक घटना

देशातील पहिला क्लायमेट वीक मुंबईत

मुंबई : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,

१२ फेब्रुवारी रोजी भारत बंद; शाळा, महाविद्यालय, कार्यालय... जाणून घ्या या दिवशी काय सुरु अन् काय बंद ?

मुंबई : विविध कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त