Cabinet Decision: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स - राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील परिपत्रक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केले आहे.


या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर यांचा समावेश असणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही या कृती दलात स्थान देण्यात आले आहे.


‘शिवार फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या कार्यपद्धतीत प्रशासकीय निर्णयांसोबत मानवी संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समतोल साधला जाणार आहे.


राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबवले जात असले, तरी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थैर्य यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या संकटात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे अत्यावश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.



नेमके काम काय करणार?


- या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या स्वतंत्रपणे न पाहता एकात्मिक पद्धतीने त्यावर उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे आणि संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे, हा या कृती दलाचा मुख्य उद्देश आहे.


- कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर मदत देण्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना मानसिक स्थैर्य देणे आणि आधीपासून सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती

Local Train News : केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे; मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

मध्य रेल्वे प्रवाशांना विनंती करते की त्यांनी केवळ स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे व उतरावे आणि

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Latur Viral Video : वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे वायर चोरीच्या आरोपावरून तीन अल्पवयीन मुलांना लोखंडी