Cabinet Decision: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स - राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश

मुंबई : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील परिपत्रक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी जारी केले आहे.


या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर यांचा समावेश असणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही या कृती दलात स्थान देण्यात आले आहे.


‘शिवार फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या कार्यपद्धतीत प्रशासकीय निर्णयांसोबत मानवी संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समतोल साधला जाणार आहे.


राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबवले जात असले, तरी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थैर्य यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या संकटात सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे अत्यावश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.



नेमके काम काय करणार?


- या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या स्वतंत्रपणे न पाहता एकात्मिक पद्धतीने त्यावर उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे आणि संकटांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे, हा या कृती दलाचा मुख्य उद्देश आहे.


- कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर मदत देण्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना मानसिक स्थैर्य देणे आणि आधीपासून सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Share Market : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीचे संकेत, आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार

मुंबई : क्रूड ऑइलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे आज जागतिक बाजारपेठांमध्ये (Share Market) कमजोरीचे संकेत मिळत आहेत. मात्र,

LPG Cylinder Booking And Delivery New Rule : LPG ग्राहकांनो लक्ष द्या! गॅस बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; कंपन्यांकडून अलर्ट जारी

मुंबई : देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. गॅस वितरणातील पारदर्शकता

Iran - America War : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा युद्धविराम प्रस्ताव फेटाळला; अमेरिका-इराण तणाव पुन्हा पेटणार!

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. युद्धविरामासंदर्भात इराणने

IPL 2026 : पुन्हा नियमभंगाचा वाद! लखनऊच्या डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याचा आरोप; बीसीसीआय कारवाई करणार का ?

चेन्नई:  आयपीएल २०२६ मध्ये रविवारी झालेल्या Chennai Super Kings आणि Lucknow Super Giants यांच्यातील सामन्यानंतर नव्या वादाला सुरुवात

National Technology Day : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (National Technology Day) देशवासियांना

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ४ हजार ५०० रुपये मिळणार ? ई-केवायसी पूर्ण केलेल्या महिलांसाठी खुशखबर

Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी एक