Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी पुढच्या अंडर १९ विश्वचषकाला मुकणार; आयसीसीकडून वैभवचा मोठा सन्मान

अंडर १९ विश्व चषक २०२६ भारतीय संघाने जिंकला. या चषकात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने शानदार कामगिरी केली. आपल्या खेळीने त्याने क्रिकेट प्रेमींची मनं जिंकली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात वैभवने १७५ धावा करून भारताला सहाव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्यास मदत केली. या स्पर्धेत तो सर्वोत्तम खेळाडू ठरला. मात्र आता तो पुढचा अंडर १९ वर्ल्ड कप खेळू शकणार नाही आहे.


चौदा वर्षांचा वैभव सूर्यवंशी दोन वर्षांत १७ वर्षांचा होईल. पुढील १९ वर्षांखालील विश्वचषक २०२८ मध्ये होणार आहे. मात्र बीसीसीआयच्या नियमांमुळे, वैभव त्या विश्वचषकात खेळू शकणार नाही. २०१६ मध्ये, बीसीसीआयने एक नियम लागू केला ज्यामध्ये कोणताही खेळाडू १९ वर्षांखालील विश्वचषकात एकापेक्षा जास्त वेळा खेळू शकत नाही. या नियमाच्या वेळी, राहुल द्रविड भारतीय १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक होते. अधिकाधिक तरुण खेळाडूंना ज्युनियर स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव मिळावा यासाठी बीसीसीआयने हा नियम केला आहे.





वैभव सूर्यवंशीचा मोठा सन्मान:


विश्व चषकाच्या अंतिम सामन्यात वैभवने केलेल्या १७५ धावांच्या खेळीमुळे भारताला इंग्लंडसमोर ४१२ धावांचं आव्हान ठेवता आलं. त्यानंतर भारताने इंग्लंडला ३११ रन्सवर ऑलआऊट करत सामन्यासह वर्ल्ड कप जिंकला. वैभव सूर्यवंशीला त्याने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यानंतर आता वैभव सूर्यवंशीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसी कडून वैभवाची थेट मुख्य भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. आयसीसीनेच याबाबतची माहिती दिली आहे.

Comments
Add Comment

IND vs PAK : आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा; पाकिस्तान माघार घेणार?

लाहोर: रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात

श्रीलंकेच्या फिरकीपुढे आयर्लंडची शरणागती

२० धावांनी थरारक विजय मिळवत यजमान संघ सरस कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान

नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने

टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात

मुंबई विमानतळावर 'विश्वविजेत्या' युवा सेनेचे शाही स्वागत, स्वागताला चाहत्यांची अलोट गर्दी

मुंबई   : हरारेच्या मैदानावर तिरंगा फडकवून सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरणारा भारताचा युवा संघ आज मायदेशात दाखल

इंग्लंडचा ४ धावांनी निसटता विजय, नेपाळची झुंज अपयशी

मुंबई  : टी-२० विश्वचषकातील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा ४ धावांनी पराभव केला. शेवटच्या