मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची चर्चा सुरू झाली आहे. आकडेवारीनुसार आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या पाच जणांत एकही भारतीय नाही.
बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी दुसऱ्या, अफगाणिस्तानचा राशिद खान तिसऱ्या, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा चौथ्या, श्रीलंकेचाच पिन्नदुवागे वानिंदु हसरंगा डी सिल्वा पाचव्या स्थानावर आहे.
शाकिब अल हसनने आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकात २००७ ते २०२४ दरम्यान ४३ सामन्यांत ५० बळी घेतले आहेत. शाहिद आफ्रिदीने ३४ सामन्यांत ३९, राशिद खानने २४ सामन्यांत ३८, लसिथ मलिंगाने ३१ सामन्यांत ३८, पिन्नदुवागे वानिंदु हसरंगा डी सिल्वाने २० सामन्यांत ३७ बळी घेतले आहेत.







