लग्नाचं आमंत्रण देत असलेल्या कुटुंबाला ऑडीने चिरडलं, ३ जणांचा मृत्यू

रेवा : मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यात ऑडी कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी एका ठिकाणी जात होते. मृतांची ओळख पटली आहे. भागवत विश्वकर्मा (५५), त्यांचा मुलगा शिवम आणि शीतल विश्वकर्मा अशी मृतांची नावं आहेत.


भागवत यांच्या मोठ्या मुलाचे लग्न २४ फेब्रुवारी रोजी होणार होते. याच लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी विश्वकर्मा कुटुंब एका ठिकाणी जात होतं त्यावेळी ऑडीने उडवलं. घरापासून फक्त २ किमी अंतरावर रेवा-प्रयागराज महामार्गावरील कोस्टा गावाजवळ अपघात झाला.


प्रयागराजकडून येणाऱ्या एका भरधाव ऑडी कारने दुचाकीला उडवले. यात विश्वकर्मा कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. अपघातात बाईक चेंदामेंदा झाली. पोलिसांनी अपघात प्रकरणी ऑडी कारच्या चालकाला पकडले आहे.


भागवत आणि शिवम हे चाचईचे रहिवासी होते, तर शीतल जवळच्या राथरा येथे वास्तव्यास होती. या सर्वांचा अपघाती मृत्यू झाला. नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. नातलगांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. विश्वकर्मा कुटुंबियांचे नातलग संजय गांधी रुग्णालयात पोहोचले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

fertilizers stock : खरीप २०२६ हंगामासाठी देशात खतांचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात ६० दिवसांच्या शांतता करारानंतर निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेच्या

Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी कोलकातातून जागतिक योग चळवळीचे करणार नेतृत्व

नवी दिल्ली : बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देणारा विशेष

Wind Energy : देशातील पहिल्या पवन ऊर्जा पुरवठा साखळी पोर्टलचा शुभारंभ

पणजी : भारताची नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था बळकट करण्याच्या आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती

Cruise Missile : लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज, 15 जून 2026 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या

FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI)

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी