लग्नाचं आमंत्रण देत असलेल्या कुटुंबाला ऑडीने चिरडलं, ३ जणांचा मृत्यू

रेवा : मध्य प्रदेशमधील रेवा जिल्ह्यात ऑडी कारने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी एका ठिकाणी जात होते. मृतांची ओळख पटली आहे. भागवत विश्वकर्मा (५५), त्यांचा मुलगा शिवम आणि शीतल विश्वकर्मा अशी मृतांची नावं आहेत.


भागवत यांच्या मोठ्या मुलाचे लग्न २४ फेब्रुवारी रोजी होणार होते. याच लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी विश्वकर्मा कुटुंब एका ठिकाणी जात होतं त्यावेळी ऑडीने उडवलं. घरापासून फक्त २ किमी अंतरावर रेवा-प्रयागराज महामार्गावरील कोस्टा गावाजवळ अपघात झाला.


प्रयागराजकडून येणाऱ्या एका भरधाव ऑडी कारने दुचाकीला उडवले. यात विश्वकर्मा कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला. अपघातात बाईक चेंदामेंदा झाली. पोलिसांनी अपघात प्रकरणी ऑडी कारच्या चालकाला पकडले आहे.


भागवत आणि शिवम हे चाचईचे रहिवासी होते, तर शीतल जवळच्या राथरा येथे वास्तव्यास होती. या सर्वांचा अपघाती मृत्यू झाला. नियमानुसार मृतदेह शवविच्छेदनासाठी रेवा येथील संजय गांधी रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. नातलगांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. विश्वकर्मा कुटुंबियांचे नातलग संजय गांधी रुग्णालयात पोहोचले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : 'युवकांना स्वावलंबी बनवणे हे सरकारचे ध्येय'

नवी दिल्ली: 'विकसित वायब्रंट व्हिलेज कार्यक्रम २०२६' च्या सहभागींसोबत रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय