राज्यसभेआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते शिवाजीरावर कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.


बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक असल्यामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे. बारामतीत अन्य कोणताही पक्ष उमेदवार देणार नाही, हेही स्पष्ट असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढवतील, तर पार्थ पवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.


ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले होते. राहुरीचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले, परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. आयोगाने यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या जागी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून संधी मिळू शकते, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरतील, असे बोलले जात आहे. मात्र सहानुभूतीची लाट पाहता शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



विनोद तावडे राज्यसभेवर जाणार?


महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, खासदार होण्यासाठी मोठ्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम सुरू केले. बिहार विधानसभा निवडणूक असो किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या, तावडे हे विश्वासू नेता ठरले आहेत. त्यामुळे या वेळी त्यांना राज्यसभेवर पाठवणे योग्य ठरेल, असे पक्षातील नेत्यांचे मत आहे. याशिवाय रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळू शकते, तसेच डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे नावही चर्चेत आहे. भाजपच्या चार जागांपैकी एक जागा महिला उमेदवारासाठी राखली जाऊ शकते, त्यामुळे विजया रहाटकर यांना पुन्हा संधी मिळेल, अशा चर्चा आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्या पसंतीच्या नावांवर केंद्रात अंतिम निर्णय होईल.



राज्यसभेची गणिते


२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. यात शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार २०२० मध्ये निवडून गेले होते, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, तर आज राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करतात. एका खासदारासाठी साधारणपणे ३७ आमदारांचा कोटा लागतो. सध्या शरद पवार गटाकडे १०, काँग्रेसकडे १६ आणि उबाठा गटाकडे २० आमदार आहेत. एकत्रितपणे ही संख्या फक्त ४६ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे महायुतीची स्थिती बळकट आहे. भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. मित्रपक्षांसह त्यांचे एकूण संख्याबळ २३५ होते. त्यामुळे महायुतीचे किमान सहा उमेदवार राज्यसभेत निवडून जाण्याची शक्यता आहे, त्यापैकी भाजपला चार जागा मिळतील.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या एका गोलंदाजासमोर ढेपाळली भारताची फलंदाजी

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी एका गोलंदाजासमोर पुरती ढेपाळली.

सलामीवीर अभिषेक शर्मा केला भलताच विक्रम

मुंबई : टी ट्वेंटी विश्वचषकातील भारताचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सूत्रे आता सुनेत्रा पवारांच्या हाती

पवार कुटुंबीयांच्या बैठकीत ठरले; सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय नेते आणि पदाधिकारी मान्य करणार मुंबई :

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक : ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा