जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान करा, मंत्री नितेश राणेंचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.


'मतदान करा, लोकशाही मजबूत करा...
राज्यात आज सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि आपल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच मतदान करने अत्यंत आवश्यक आहे...
आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जि.प. व पंचायत समिती साठी सर्वत्र मतदान होत आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे...
मतदान करा व आपली लोकशाही मजबूत करा...
मतदानाची वेळ :-
सकाळी ०७:३० ते सायं ०५:३० वाजेपर्यंत...'


अशी पोस्ट करून मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.


राज्यातील जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान सुरू आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची

मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक

मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे

मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार - मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण.... - 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

अजित पवार यांच्या निधनाबद्दल रोहित पवारांचे राजकारण अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद - आनंद परांजपे

अजितदादा पवार यांच्या दु:खद व दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत ते अत्यंत चुकीचे आणि