जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान करा, मंत्री नितेश राणेंचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.


'मतदान करा, लोकशाही मजबूत करा...
राज्यात आज सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि आपल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच मतदान करने अत्यंत आवश्यक आहे...
आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जि.प. व पंचायत समिती साठी सर्वत्र मतदान होत आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे...
मतदान करा व आपली लोकशाही मजबूत करा...
मतदानाची वेळ :-
सकाळी ०७:३० ते सायं ०५:३० वाजेपर्यंत...'


अशी पोस्ट करून मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.


राज्यातील जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान सुरू आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबद्दल इराणने केली यूएईकडून भरपाईची मागणी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेतील देशांसमोर मोठ्या अडचणी उभ्या

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरी विजेता होणार मालामाल; फॉर्च्युनर कारसह मिळणार लाखोंची बक्षिसे

कुस्तीप्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच

पंतप्रधान मोदींचा विक्रम, सर्वाधिक ८९३१* दिवस सरकार प्रमुख

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारचे नेतृत्व करत सार्वजनिक पदावर दीर्घकाळ काम करण्याचा नवा विक्रम

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री