U19 World Cup : बीसीसीआयकडून ७.५ कोटींच्या बक्षीसाची घोषणा

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १६ व्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऐतिहासिक सहावे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय युवा संघावर आता कौतुकाचा आणि बक्षीसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वविजेत्या भारतीय संघासाठी ७.५ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची अधिकृत घोषणा केली आहे.


शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी धुव्वा उडवत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियाद्वारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हे विशेष बक्षीस जाहीर केले. संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. तर मुख्य प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी १५ लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल.


या संपूर्ण स्पर्धेत आणि विशेषतः फायनलमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. केवळ १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावांची वादळी खेळी करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला ३५० हून अधिक धावांचा डोंगर उभा करता आला, जो इंग्लंडला सर करता आला नाही.


"आमच्या युवा खेळाडूंनी मैदानावर दाखवलेले कौशल्य आणि जिद्द अभिमानास्पद आहे. हे यश भारतीय क्रिकेटची मुळे किती मजबूत आहेत हे दर्शवते," असे गौरवोद्गार जय शाह यांनी काढले. या रोख बक्षीसाव्यतिरिक्त, मायदेशी परतल्यावर टीम इंडियाचे भव्य स्वागत आणि सत्कार समारंभ आयोजित केला जाण्याची शक्यता आहे.



सूर्यवंशी विश्वचषकाचा नवा 'विक्रमवीर'


केवळ १४ वर्षांच्या वैभवने २०२६ च्या विश्वचषकात अशा काही खेळी केल्या ज्याने क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. युवा विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा तो जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने केवळ ८० चेंडूत १७५ धावा कुटल्या. ही युवा विश्वचषक फायनलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

Comments
Add Comment

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे.

अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून

T20 World Cup 2026 Ind vs WI : दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत; जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाकोणाची समावेश

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून