Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशी हतबल झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी कायम आहे.



धीम्या गतीने वाहतूक पुण्याच्या दिशेने:


मिळालेल्या माहितीनुसार, गॅस टँकर पलटी झाल्यानंतर तब्बल ३२ तासांसाठी बंद पडलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर (Mumbai Pune Expressway) पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या १० किमी रांगा लागल्या आहेत. मुंबईकडून पुण्याकडे (Mumbai Pune Expressway) जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. धीम्या गतीने वाहतूक पुण्याच्या दिशेने सरकत आहे.



१० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा:


खोपोली हद्दीतील अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाकादरम्यान १० किमीपर्यंत मोठया प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विकेंड असल्याने अनेकजण घराबाहेर पडले असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) वाहतूक कोंडीत अडकले आहेत. ३२ तास रस्ता बंद असल्याने सकाळी लवकर घाट पार करून जाण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिक लवकर बाहेर पडल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचा अंदाज आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.



बोरघाटात वाहने पडली बंद:


अनेक वाहन बोरघाटात बंद पडलेली आहेत. घाटामध्ये आता पुन्हा गाड्या बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही.


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीची (Mumbai Pune Expressway Traffic) दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे