अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण थांबवा!, मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, याबाबत सुरू असलेले राजकारण तात्काळ थांबवावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. हा वाद निरर्थक, चुकीचा आणि खालच्या पातळीचा असल्याचे सांगत, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंना त्यांनी खडेबोल सुनावले.


अजित पवार यांच्या निधनानंतर काही घटकांकडून विविध तर्कवितर्क मांडले जात असून, या दु:खद घटनेतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. जनतेत लोकप्रिय असलेले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक आपल्यातून निघून गेल्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण या घटनेला स्वतःच्या राजकीय चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न करत असून, ही मानसिकता धोकादायक असल्याचेही त्यांनी नमूद केले.


मुंबईहून बारामतीकडे प्रचारसभेसाठी रवाना झाले असताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने नव्या चर्चांना तोंड फुटले. मात्र, या सर्व घडामोडींना अनावश्यक राजकीय रंग देणे अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशा दु:खद प्रसंगी संयम राखणे, संवेदनशीलता दाखवणे आणि कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करणे हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.



'महिंद्रा'ची १५ हजार कोटींची गुंतवणूक


विदर्भाला औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्वागत केले. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून, नागपूरमध्ये १ हजार ५०० एकर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठा एकात्मिक वाहन आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, संभाजीनगर येथे १५० एकरांवर सप्लायर पार्क विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दरवर्षी ५ लाखांहून अधिक वाहनांचे आणि १ लाख ट्रॅक्टरचे उत्पादन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकासाला गती मिळेल तसेच वाहनउद्योग, शेती उपकरणे, तंत्रज्ञान आणि सप्लाय चेन क्षेत्राला चालना मिळेल. महाराष्ट्राला उत्पादन क्षेत्रात अग्रस्थानावर नेण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे