लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार


मुंबई : महिलांवरील हिंसाचार, अत्याचार किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि सर्वांगीण मदत मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्रांच्या दैनंदिन कामकाजासाठी निधीची अडचण दूर होणार असून सेवा अधिक सुरळीतपणे राबवता येणार आहेत.


केंद्र सरकारच्या ‘मिशन शक्ती’ योजनेतील ‘संबल’ उपयोजनेअंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या वन स्टॉप सेंटर्ससाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०२६च्या अर्थसंकल्पाच्या आधीच बुधवारी या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. वन स्टॉप सेंटर्समध्ये संकटग्रस्त महिलांसाठी एकाच ठिकाणी मानसिक समुपदेशन, वैद्यकीय मदत, पोलिसांची मदत, तात्पुरते निवासस्थान तसेच कायदेशीर सल्ला व मदत या सुविधा दिल्या जातात. त्यामुळे पीडित महिलांना वेगवेगळ्या कार्यालयांत वारंवार जाण्याची गरज राहत नाही.


आतापर्यंत या केंद्रांसाठी एकच अर्थसंकल्पीय तरतूद वापरली जात होती, जी मुख्यत्वे इमारती व पायाभूत सुविधांसारख्या खर्चापुरती मर्यादित होती. कर्मचारी वेतन, वीज-पाणी बिले आणि रोजचा प्रशासकीय खर्च यासाठी निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे दैनंदिन कामकाजासाठी स्वतंत्र 'बजेट हेड' असावा, निधी अडथळ्याशिवाय मिळावा आणि सेवा खंडित होऊ नयेत, यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


अंमलबजावणी कशी होणार?

ही योजना सामाजिक सुरक्षा व कल्याण या वर्गवारीखाली येत असून, यासाठीचा १०० टक्के खर्च केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे. महिला व बालविकास आयुक्त (पुणे) यांच्याकडे खर्चावर नियंत्रणाची जबाबदारी राहणार असून, आयुक्तालयातील लेखाधिकारी 'ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर' म्हणून काम पाहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील वन स्टॉप सेंटर्स अधिक सक्षमपणे कार्यरत राहतील आणि संकटात सापडलेल्या महिलांना आवश्यक सेवा वेळेवर मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Bihar : नितीश राजीनामा देणार, बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या (१४ एप्रिल) आपल्या

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

N Chandrasekaran : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर बोलले टाटा सन्सचे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर)