IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल, परंतु १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणारा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता पाकिस्तानी युट्यूबर आणि अभिनेता अरसलान नसीर याने एक वादग्रस्त विधान केले आहे. यात त्याने म्हटले आहे की 'जर आयसीसीचे कार्यालय भारतात असते तर ते बॉम्बने उडवले असते." पाकिस्तानी युट्यूबरने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याविरुद्धही विष ओकले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.



त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते: 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, अर्सलान जय शहा यांना उद्देशून म्हणाला, "तुमच्या मर्यादेत राहा. हे २५ लोकांसाठी तुमचे छोटेसे कार्यालय आहे. तिथे बसा आणि YouTube आणि Netflix पाहण्याचा आनंद घ्या. आयसीसीचे कार्यालय दुबईत आहे, त्यामुळे ते सुरक्षित आहे. जर हे कार्यालय भारतात असते तर आमच्या लोकांनी त्या मुख्यालयावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते."


टी-२० विश्वचषक शनिवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानने स्पर्धा सुरू होण्याच्या फक्त ०६ दिवस आधी भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने केवळ टीम इंडियाविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही तर बांगलादेशनेही यापूर्वी स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशने त्यांचे लीग सामने भारताव्यतिरिक्त इतर देशात हलवण्याची विनंती केली होती. तथापि, आयसीसीने बांगलादेशची विनंती फेटाळून लावली आहे.





आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:


पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान "यू-टर्न" घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना