मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही खाण बेकायदेशिररित्या चालवली जात होती. खाणीत काम सुरू असताना थांगस्कू भागात स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जण भाजला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक प्रकट केला. पंतप्रधान कार्यालयाने नियमानुसार मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत जहीर केली. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


दुर्घटनेमुळे कोळसा खाणीत काम करत असलेले अनेकजण अडकून पडले आहेत. खाणीत अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले. दुर्घटना झाली त्यावेळी खाणीत नेमके किती जण कार्यरत होते हे अद्याप समजलेले नाही. दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला प्रथमोपचारांनंतर शिलाँग येथील मोठ्या रुग्णालयात दाखल केले आहे.


खाणीत झालेल्या स्फोटाची सखोल पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट नेमका कशाचा होता हे तपासातून कळेल, असेही पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने