मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही खाण बेकायदेशिररित्या चालवली जात होती. खाणीत काम सुरू असताना थांगस्कू भागात स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जण भाजला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक प्रकट केला. पंतप्रधान कार्यालयाने नियमानुसार मृतांच्या वारसांना दोन लाख रुपयांची मदत जहीर केली. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येकाला ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.


दुर्घटनेमुळे कोळसा खाणीत काम करत असलेले अनेकजण अडकून पडले आहेत. खाणीत अडकलेल्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले. दुर्घटना झाली त्यावेळी खाणीत नेमके किती जण कार्यरत होते हे अद्याप समजलेले नाही. दुर्घटनेत भाजलेल्या व्यक्तीला प्रथमोपचारांनंतर शिलाँग येथील मोठ्या रुग्णालयात दाखल केले आहे.


खाणीत झालेल्या स्फोटाची सखोल पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट नेमका कशाचा होता हे तपासातून कळेल, असेही पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर