कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष निवडू

सुनील तटकरे; २०१९ मध्ये भाजपसोबत जाण्याची अजित पवारांची इच्छा का झुगारली?


मुंबई : "राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवलेल्या कठीण काळात पक्षाची घडी बसवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबूत करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. विधिमंडळ पक्षनेत्याची निवड आवश्यक होती आणि ती पूर्ण करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय घेताना कार्यकर्ते, आमदार आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल", अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी स्पष्ट केली.


माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य मजबूत करण्यासाठी सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय हे वैयक्तिक नव्हते, तर पक्षाच्या सामूहिक भूमिकेतून घेतलेले होते. हीच परंपरा पुढेही कायम ठेवली जाईल. सध्या विधिमंडळ पक्षनेत्याची जागा भरणे अधिक महत्त्वाचे होते. उर्वरित निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य वेळी घेतले जातील.


अजित पवारांच्या राजकीय भूमिकेवर बोलताना तटकरे म्हणाले की, २०१९ मध्ये अजित पवारांची इच्छा होती की भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार व्हावे. त्यावेळी त्यांच्या इच्छेकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्यांना कठोर निर्णय घ्यावे लागले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लढत दिली, याची आकडेवारी सर्वांसमोर आहे. जनतेने एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयाला मोठा कौल दिला, असेही त्यांनी नमूद केले.


विलीनीकरणाच्या चर्चांवर तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा घटक पक्ष असून भाजपचा मित्रपक्ष आहे. सरकारमध्ये सहभाग, लोकसभा निवडणूक आणि सध्याची सत्तेतली भागीदारी पाहता विलीनीकरणाबाबत कोणतीही ठोस चर्चा झालेली नाही. विलीनीकरण कोणत्या पक्षात आणि कसे होणार, याबाबत कुणीही स्पष्ट बोलत नसल्याचे त्यांनी सांगितले.


विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची

  • विधिमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड जनतेच्या आणि आमदारांच्या भावनांचा आदर राखून करण्यात आली आहे. या निर्णयावर शंका उपस्थित करणे योग्य नाही, असे तटकरे यांनी ठामपणे सांगितले. अजित पवार यांनी गेल्या काही वर्षांत निर्माण केलेला जनसंपर्क आणि संघटन बळाच्या जोरावरच पक्षाला मोठा पाठिंबा मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला.

  • अजित पवार यांनी पक्षाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले, ती परंपरा पुढे नेण्याचे आव्हान आता सुनेत्रा पवार आणि उर्वरित नेतृत्वासमोर आहे. विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, आगामी काळात आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच पक्ष अधिक मजबूत केला जाईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Bihar : नितीश राजीनामा देणार, बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार उद्या (१४ एप्रिल) आपल्या

Blue Flag Beach : श्रीवर्धन समुद्रकिनारा ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित होणार

मुंबई : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा शाश्वत विकास साधत त्याला ‘ब्लू फ्लॅग बीच’ म्हणून विकसित

Maharashtra : गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार

मुंबई : "गोदा ते नर्मदा" या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून

Maharashtra : उदंचन जलविद्युत प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र अग्रेसर ठरणार

मुंबई : राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार येत उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक

Heat Wave : उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज

मुंबई  : वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये

N Chandrasekaran : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर बोलले टाटा सन्सचे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर)