महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत आला 'सर्वोच्च' निर्णय

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.


रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ताब्यात ठेवण्यासाठी सुमारे चारशे नव्या सदस्यांची नोंदणी केली आहे. नोंदणी करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला. रोहित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचा मित्र परिवार, नातलग आणि त्यांच्या प्रभावातील इतर सदस्य, अगदी त्यांच्याच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा भरणा नव्या मतदारांमध्ये असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केला होता. केदार जाधवांच्या या आरोपात तथ्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्यांची छाननी केल्यानंतर मान्य केले होते. हा निर्णय पण सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला. सरन्यायाधीशांनी तर "ही फसवणूक आहे" इथपर्यंत कडक शब्दांचा वापर करत रोहित पवारांची एकप्रकारे कानउघाडणी केली आहे.


मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ झाली की खेळाचा आत्मा हरवतो. संस्थेवर वर्चस्व गाजवण्यासाठी जेव्हा 'घरच्या' माणसांची फौज उभी केली जाते, तेव्हा गुणवत्तेला बाजूला सारलं जातं. रोहित पवारांसाठी हा केवळ कायदेशीर धक्का नाही, तर त्यांच्या नैतिकतेवर उठलेलं प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेटच्या पीचवर 'क्लीन बोल्ड' होण्याची वेळ रोहित पवारांवर आली आहे.

Comments
Add Comment

Nashik : टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, पीडितेचं नाव बदललं अन्....

नाशिक : नाशिक शहरातील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

Iran - America War : अब्बास अराघचींचा ४८ तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; शांतता प्रयत्नांना वेग

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आज म्हणजेच मंगळवार २८ एप्रिल रोजी पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये पोहोचले