ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींची धक्कादायक कृती

गाझियाबाद : ऑनलाईन गेम खेळणाऱ्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी एक धक्कादायक कृती केली. या तीन अल्पवयीन बहि‍णींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. या धक्कादायक घटनेत तिघींचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरात ही घटना घडली आहे.



घरच्यांनी तिघींच्या सतत ऑनलाईन गेम खेळण्यावर आक्षेप घेतला. यामुळे निराश झालेल्या तीन अल्पवयीन बहि‍णींनी टोकाचा निर्णय घेतला. मृत मुलींचे वय अनुक्रमे बारा, चौदा आणि सोळा होते.


टोकाचा निर्णय घेणाऱ्या मुली टिला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी परिसरातल्या भारत सिटीमध्ये वास्तव्यास होत्या. मुलींनी एकदम टोक गाठल्याचे बघून पोलीस पण चक्रावले आहेत. या धक्कादायक घटनेचा पोलीस तपास सुरू आहे. मुलींनी टोकाचा निर्णय घेण्यामागे फक्त ऑनलाईन गेम खेळण्यावर घेतलेला आक्षेप एवढेच कारण आहे की अन्य काही बाब आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व शक्यतांचा विचार करून तपास केला जाईल आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले.


मुलींनी बुधवार ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारली. याआधी नेमके काय घडले याचा पोलीस बारकाईने तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मुली ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचा कोरियन लव्हर हा गेम खेळत होत्या.


प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार तिघी बहिणी बाल्कनीत आल्या. आधी एकीने उडी मारली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर दोघींचाही मृत्यू झाला. तिघीजणी नवव्या मजल्यावरुन एकदम खाली जमिनीवर कोसळल्या. काय घडले आहे याची जाणीव होताच प्रत्यक्षदर्शीने मदत मागवली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलावण्यात आले. मुलींनी उडी मारण्याआधी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या चिठ्ठीत वडिलांची माफी मागत एका डायरीचा उल्लेख करण्यात आला आहे. डायरीत सर्व सत्य कथन केल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. यामुळे पोलिसांनी डायरी ताब्यात घेतल्याचे समजते.


मुलींच्या वडिलांनी दोन वेळा लग्न केले होते. पहिल्या पत्नीपासून बराच काळ मूल झाले नाही म्हणून तिच्याच सख्ख्या बहिणीशी त्यांनी लग्न केले होते. यामुळे कौटुंबिक पातळीवर नेमके काय घडले याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Comments
Add Comment

New Ropeway Project : माथेरान ते रायगड किल्ल्यासह पाच महत्त्वाकांक्षी रोप-वे प्रकल्पांना मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय

रायगड : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis : हवामान विभागाचे अलर्ट पाहूनच घराबाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर मुंबई : "राज्यात

Vaibhav Sooryvanshi : वैभवची इन्स्टा पोस्ट व्हायरल ! दुसऱ्या सामन्यात पदर्पण होणार ? चर्चांना उधाण

Manchester : भारत आणि इंग्लंड मधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (जुलै) रोजी मॅंचेस्टर येथे खेळला जाणार

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यावर पावसाचे संकट! पावसामुळे सामना रद्द होणार?

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) मँचेस्टरमध्ये

Mumbai Hit And Run : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील

Raj thackeray : वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे दाखवून द्या!

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची टीका मुंबई :