Mumbai-Pune journey: मुंबई-पुणे प्रवास आता फक्त ४८ मिनिटांत - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी वाढवण बंदरासाठी थेट जलद रेल्वे जोडणीची घोषणा केली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी २ फेब्रुवारी रेल्वे प्रकल्पांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्पांचे काम सुरू असल्याचे सांगून आता लवकरच मुंबई-पुणे प्रवास फक्त ४८ मिनिटांमध्ये करता येईल असे सांगितले.



काय म्हणाले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ?


राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात दुहेरीकरण, चौपदरीकरण अशा मार्गांचा समावेश आहे. राज्यातील दुसरी बुलेट ट्रेन मुंबई-पुणे-हैदराबाद मार्गावर धावणार आहे. याचबरोबर वाढवण बंदराला नव्या समर्पित मालवाहतुकीची जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे प्रवासी आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.





१५ डब्यांच्या अधिक लोकल फेऱ्या:


रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की; कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणात कवच प्रणाली कार्यान्वित करण्याची प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाने सुरू केली आहे. तसेच मुंबई उपनगरी रेल्वेवरील गाड्यांची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १५ डब्यांच्या अधिक लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर लोकलची प्रवासी संख्या लक्षात घेता मेट्रोहून अधिक उन्नत आराखड्यात २३८ वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येणार आहे.



मुंबई-पुणे ४८ मिनिटांत :


अर्थसंकल्पात चार हजार किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन विस्ताराचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला. मुंबई-पुणे-हैदराबादसह सात मार्गांचा यात समावेश करण्यात आला आहे. मुंबई-हैदराबाद मार्गावरून राज्यातील दुसरी बुलेट ट्रेन धावणार आहे. यामुळे मुंबई-पुणे अंतर केवळ ४८ मिनिटांत तर पुणे-हैदराबाद हे अंतर एक तास ५५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. याचा थेट फायदा मुंबई-पुणेदरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होईल. बुलेट ट्रेनमुळे दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अंतर कमी होईल. त्याचबरोबर बुलेट मार्गालगत कंपन्या, शहरीकरण आणि आयटी हब उभारणीमुळे रोजगारातही वाढ होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

संगमनेरमध्ये शिवजयंतीच्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

एकाला अटक ; शहरात भीतीचे वातावरण संगमनेर : संगमनेर शहरात जुन्या वादातून एका तरुणावर पाच जणांच्या टोळक्याने कोयता

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान; आंब्याच्या बागांनाही अवकाळीचा फटका

बीड : बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी,गारा कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण

Nagpur News : बारावी पेपरफूटी प्रकरणी आणखी दोघांना अटक

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील

Navnath Ban: नगरसेवक नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती

मुंबई: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा या छोट्याशा गावातून देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईपर्यंतचा

Pune: पुण्यातील 'या' वाहतूक मार्गात बदल; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश

पुणे: पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे मौजे रामलिंग रोड, शिरुर येथे आयोजन करण्यात आलं असून २४

Mira-Bhayander Police Recruitment: पोलीस भरतीदरम्यान तरुणाला रंगेहाख पकडलं, नेमकं घडलं काय?

मुंबई: सध्या अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक