दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेपूर्वी ताण हटणार !

यवतमाळ : दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास व परीक्षेसंदर्भातील अडचणी, शंका किंवा समस्या दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, तणावमुक्त होता यावे या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.


बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घेता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सकारात्मक मानसिकतेने आणि तयारीसह सामोरे जाणे आवश्यक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील शंका मिटविण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.


यासाठी राज्य बोर्डाने ही हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८९३७५६) तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८८१०७५) हे क्रमांक दिले आहेत.

Comments
Add Comment

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत

ST NCMC Card : एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने

Breaking News : पुणे पुन्हा हादरलं! ५० वर्षीय व्यक्तीकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आजोबांकडून नातीवर अत्याचार

पुणे : पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अशातच आता पुन्हा एकदा

Eknath Shinde : आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे”; न्यायालयात फाशीची मागणी करणार

SIT नेमणूक; दोन आठवड्यांत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश, तपासावर उच्चस्तरीय देखरेख, पॅरोलवर सुटकेला सरकारचा

Pune Crime : अटकेची भीती अन् ७ लाख रुपयांचा चुना; पुण्यातील पोलिसांचे प्रताप

पुणे : भीती दाखवत एखाद्याकडून खंडणी वसुली केली जाते आणि पोलीस आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकतात, पण जर पोलीसच खंडणी