शिवसेनेच्या मुंबई महापालिका गटनेतेपदी अमेय घोले

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण नगरसेवक आणि एकेकाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळ असलेले अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आलेले असून हे दोन्ही पक्ष आपल्या पक्षाची नोंदणी एकत्रपणे करतात की स्वतंत्र याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने आपला गटनेता निवडून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.


मुंबई महापालिकेत भाजपच्या गटनेते पदी गणेश खणकर यांची निवड करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपला गटनेता निवडला. शिवसेनेतील सर्वात तरुण आणि अभ्यासू अशी त्यांची ख्याती आहेत. भाजपचे ८९ तर शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आलेले असून यासर्व नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यालयात नोंदणी झाली नवहती. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक आणि वैधानिक तसेच विशेष समित्यांमध्ये संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही पक्ष गट करून एकत्र नोंदणी करतील अशी चर्चा होती. पण दोन्ही पक्षाचे स्वतंत्र गटनेते निवडले गेले आहेत.


अमेय घोले हे प्रभाग १७८मधून निवडून आले असून त्यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर पक्षाच्या सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे,पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी त्यांचे अभिनंदन केले. गटनेते निवडीनंतर भाजप आणि शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, माजी खासदार मनोज कोटक आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर भाजपसोबतच सोमवारी शिवसेना नगरसेवकांची नोंदणी केली जात आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Crime : उल्हासनगर हादरले! आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या वादातून पोटच्या गोळ्याला संपवले; आईकडून २० वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या

Ulhasnagar : उल्हासनगरमधून एक अतिशय हादरवून टाकणारी आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दुसऱ्या जातीच्या

Nashik Kumbhmela : गर्दी व्यवस्थापनासाठी मास्टर प्लॅन; मार्चपर्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न; शेखर सिंहांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला आता वेग आला आहे. रस्ते, घाट, वाहतूक, विमानतळ,

Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुका पुन्हा लांबणीवर

४ ऑगस्टच्या यादीला ब्रेक; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय मुंबई : मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात