मैदानात उतरण्यापूर्वीच 'पाक'ने टेकले गुडघे, भारताविरुद्धच्या महामुकाबल्यातून माघार

नवी दिल्ली  : आगामी टी-२० विश्वचषकाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पाकिस्तान सरकारने या स्पर्धेतील आपल्या संघाच्या सहभागाला हिरवा झेंडा दाखवला असला, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळण्यास मात्र स्पष्ट नकार दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरणार नाही, अशी अधिकृत घोषणा रविवारी संध्याकाळी करण्यात आली.


पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नकवी यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आयसीसीने बांगला देशच्या जागी स्कॉटलंडला संधी दिल्यामुळे पीसीबीने नाराजी व्यक्त केली होती. बांगलादेशवर अन्याय झाल्याची भूमिका घेत नकवी यांनी जागतिक क्रिकेट नियामक मंडळावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून स्पष्ट केले की, ‘‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय क्रिकेट संघाला आयसीसी विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे; मात्र १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या नियोजित सामन्यात पाकिस्तानचा संघ खेळणार नाही’’. यापूर्वी मोहसीन नकवी यांनी या संदर्भातील अंतिम निर्णय ३० जानेवारी किंवा २ फेब्रुवारी रोजी घेतला जाईल, असे संकेत दिले होते. मात्र, अपेक्षेपेक्षा एक दिवस आधीच सरकारने आपला पवित्रा जाहीर करून क्रीडा विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना तांत्रिकदृष्ट्या सोडून दिला आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या या स्पर्धेत पाकिस्तानचा समावेश 'गट अ' मध्ये आहे. या गटात भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. सलमान अली आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानचा संघ आपल्या मोहिमेची सुरुवात स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने करेल.

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व

MI VS KKR : मुंबई विरुद्ध केकेआर मध्ये हायव्होल्टेज लढत; प्लेऑफसाठी KKR ला विजय आवश्यक; हार्दिक पांड्याचे पुनरागमन ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज 65 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना Eden Gardens