तिरुवनंतपुरममध्ये किवींचा धुव्वा

भारताने मालिका विजयावर उमटवला शिक्का


तिरुवनंतपुरम : टी-२० वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ४६ धावांनी धुव्वा उडवला.


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली होती. अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती.


मात्र सॅमसन तिसऱ्याच षटकात ६ धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेकही चांगल्या सुरुवातीनंतर ५ व्या षटकात बाद झाला. त्याने १६ चेंडूंतच ३० धावांची खेळी केली. दोघांनाही लॉकी फर्ग्युसनने बाद केले. या दोन विकेट्सनंतर मात्र इशान किशनचे वादळ न्यूझीलंडवर घोंगावले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. इशान किशन अत्यंत आक्रमक खेळत होता. त्याने २८ चेंडूतच अर्धशतक केले. तसेच १२ व्या षटकांत इश सोधीविरुद्ध २९ धावाही चोपल्या. त्याच्यासोबत सूर्यकुमारही चांगला खेळत होता. त्यानेही २६ चेंडूंत अर्धशतक केले. पण अर्धशतकानंतर तो १५ व्या षटकात बाद झाला. त्याला मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक टीम सिफर्टने यष्टीचीत केले. सूर्यकुमारने ३० चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ६३ धावा केल्या. पण असे असले तरी इशान मात्र त्याच्या लयीत खेळत होता. त्याने ४२ चेंडूंत त्याचे शतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यांने आपल्या ४ षटकांमध्ये पाच बळी घेतले.


न्यूझीलंडचा डाव २२५ धावांवर आटोपला
सलामीवीर टीम सेफर्ट स्वस्तात बाद झाला. सेफर्टला अवघ्या ५ धावांवर अर्शदीप सिंगने माघारी धाडले. त्यानंतर फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. अॅलनने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. अॅलन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र अक्षर पटेलने त्याची झंझावाती खेळी थांबवली. अॅलनने ६ षटकार आणि ८ चौकारांसह ३० चेंडूंत ८० धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर कोणी मोठी कामगिरी केली नाही आणि संपूर्ण न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने ४६ धावांनी हा सामना जिंकून मालिकेचा शेवट दिमाखात केला.

Comments
Add Comment

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी