भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल

विकासाभिमुख आणि व्यवहार्य अर्थसंकल्प


मुंबईच्या उद्योग व विकासवाढीला चालना देणारा अर्थसंकल्प


भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत


मुंबई : मोदी सरकारने आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला विकासाभिमुख आणि व्यवहार्य असे संबोधून या अर्थसंकल्पात मुंबईसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीच्या उदयोग व विकासवाढीला मोठी चालना मिळणार आहे. आजचा अर्थसंकल्प भारत विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि कोविड-१९ मधून सर्वात वेगाने सावरणारी अर्थव्यवस्था ठरला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे मुंबई अध्यक्ष व अंधेरी पश्चिमचे आमदार अमीत साटम यांनी दिली.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी बोलताना आमदार साटम म्हणाले की, अर्थसंकल्पामध्य देशात सात अतिवेगवान रेल्वे काॅरीडरची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई-पुणे हा एक कॉरीडॉर आहे. यामुळे मुंबई व पुणे या दोन मोठ्या शहरातली वाहतूक सुलभ व जलद होणार आहे.


आमदार अमीत साटम यांनी अधोरेखित केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी जमिनीखाली रस्त्याचे जाळे विणणारा पाताळ लोक प्रकल्प घोषित केला आहे. हा महत्त्वाकांक्षी ७० किमी लांबीचा प्रकल्प भूमिगत बोगद्याचे जाळे असून मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवून आणणार आहे. बोगद्यासाठी लागणाऱ्या टनल बोअरिंग मशिनसाठी आपण आयातीवर निर्भर होतो. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात टीबीएम मशिनच्या स्थानिक उत्पादकांना करमाफी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे टीबीएम मशीनवरचे आपले चीन व इतर देशावरचे अवलंबीत्व संपणार असल्याचे आमदार साटम यांनी स्पष्ट केले.


आजच्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांसाठी SHE मार्ट उभारण्याचे जाहीर केले आहे. याचा स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना मोठा लाभ होईल. मोठ्या शहरांमध्ये १००० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या नगरपालिका बाँडना १०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. बृहन्मुंबई ही आशिया खंडातील मोठी व श्रीमंत महानगरपालिका आहे. या बाँड अनुदानाचा मुंबई महानगरपालिकेला मोठा लाभ होणार असल्याचा दावा आमदार अमीत साटम यांनी केला.


१५,००० माध्यमिक शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला मोठी आर्थिक मदत केली जाई, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगास (एमएसएमई) विकास इंजिन म्हणून स्थान दिले असून त्यासाठी 7 लाख कोटी रुपये विकास निधी जाहीर केला. या भरघोस निधीमुळे तसेच मुंबईतील उद्योग व विकास वाढीला आणखी चालना मिळणार असल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.


Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास