buget 2026 : पायाभूत सुविधांसाठी १२ लाख कोटींची तरतूद; देवेंद्र फडणवीसांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सलग ९व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शहरीकरण, रोजगारनिर्मिती, शेती आणि महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष देण्यात आले.


अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प “विकसित भारताच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल” असल्याचे म्हटले आहे. नियोजनबद्ध शहरीकरण, उद्योग व उद्योजकतेला चालना देणे तसेच गुंतवणूक वाढवून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.



पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक


या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर करण्यात आली आहे. रस्ते, रेल्वे, वाहतूक आणि शहरी पायाभूत सुविधांवर खर्च वाढवण्यात येणार असून, यामुळे आर्थिक गतीला चालना मिळणार आहे. याशिवाय शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन क्षेत्रासाठीही भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत.



महिलांसाठी स्वतंत्र संधी


महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने लखपती दीदी योजनेनंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी निर्माण करण्याची योजना महत्त्वाची ठरणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रात जिल्हा रुग्णालयांमध्ये आपत्कालीन चिकित्सा व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात अधोरेखित करण्यात आला आहे.



हायस्पीड कॉरिडॉर आणि ग्रोथ हब


मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रोथ हबसाठी पुढील पाच वर्षांत ५,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, याचा लाभ मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), पुणे महानगर आणि नागपूर महानगर क्षेत्रांना होणार आहे.


एकूणच अर्थसंकल्प २०२६ हा दीर्घकालीन विकासावर लक्ष केंद्रित करणारा असून, पायाभूत सुविधा, शहरी विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या प्रमुख मुद्द्यांवर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.




Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग