होत्याच झालं नव्हतं... धावती लोकल पकडायला गेली अन्.....

बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण हीच धावपळ, हीच गर्दी एका नवविवाहितेच्या जीवावर बेतली आहे.



नेमकं घडल काय ?


सकाळची ८ वाजून ११ मिनिटांचीची सीएसएमटी ट्रेन आणि बदलापूर स्टेशनवर जमलेली प्रचंड गर्दी, प्रत्येक जण ट्रेन पकडण्यासाठी घाई करत होतेआणि अश्यातच २८ वर्षीय चेतना चंद्रशेखर देवरुखकर ही तरुणी सुद्धा ट्रेन पकडण्याच्या धावपळीत होती, काही कारणास्तव ट्रेन पकडायला तिला उशीर झाला. अन् ट्रेन स्टेशनवरून सुटली, तीच सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी चेतना प्रयत्न करत होत्या. याच प्रयत्नात त्यांच्या तोल गेला आणि त्या ट्रेनखाली आल्या यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.


चेतना देवरुखकर यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्या बदलापूर जुवेळी येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनानाची बातमी समजताच देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे.


मुंबईत गर्दी वाढत चालल्याने ट्रेनला ही प्रचंड गर्दी असते. अनेकजण ट्रेनला लटकतात जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडतात. आणि याच धावपळीत याच प्रवासात अनेकजण आपल्या जीवाला मुकतात. अति घाई संकटात नेई, एक ट्रेन चुकली तर चुकूदेत आपल्या आयुष्य लाखमोलाचा असत. याचे भान प्रवाशांनी राखणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची