होत्याच झालं नव्हतं... धावती लोकल पकडायला गेली अन्.....

बदलापूर : सकाळची प्रचंड गर्दीची वेळ आणि प्रत्येक जण वेळेवर लोकल पकडून कामावर वेळेवर जाणयासाठी धावपळ करत असतो. पण हीच धावपळ, हीच गर्दी एका नवविवाहितेच्या जीवावर बेतली आहे.



नेमकं घडल काय ?


सकाळची ८ वाजून ११ मिनिटांचीची सीएसएमटी ट्रेन आणि बदलापूर स्टेशनवर जमलेली प्रचंड गर्दी, प्रत्येक जण ट्रेन पकडण्यासाठी घाई करत होतेआणि अश्यातच २८ वर्षीय चेतना चंद्रशेखर देवरुखकर ही तरुणी सुद्धा ट्रेन पकडण्याच्या धावपळीत होती, काही कारणास्तव ट्रेन पकडायला तिला उशीर झाला. अन् ट्रेन स्टेशनवरून सुटली, तीच सुटलेली ट्रेन पकडण्यासाठी चेतना प्रयत्न करत होत्या. याच प्रयत्नात त्यांच्या तोल गेला आणि त्या ट्रेनखाली आल्या यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यु झाला.


चेतना देवरुखकर यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. त्या बदलापूर जुवेळी येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनानाची बातमी समजताच देवरुखकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी अपघाती निधनाची नोंद केली आहे.


मुंबईत गर्दी वाढत चालल्याने ट्रेनला ही प्रचंड गर्दी असते. अनेकजण ट्रेनला लटकतात जीव धोक्यात घालून धावती लोकल पकडतात. आणि याच धावपळीत याच प्रवासात अनेकजण आपल्या जीवाला मुकतात. अति घाई संकटात नेई, एक ट्रेन चुकली तर चुकूदेत आपल्या आयुष्य लाखमोलाचा असत. याचे भान प्रवाशांनी राखणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी

रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची सदिच्छा भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती

'गाडगेबाबांचा जीवन संदेश आचरणात आणण्याची गरज'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा,

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची गुणवत्ता तपासणार

खडी मुरमाच्या दबाईसाठी कोर कटिंग बंधनकारक! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली नवीन

टीएमएस २ .०  मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीएमएस २ .०  (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीचा आज शुभारंभ मुंबई : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य

बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी- डॉ.