सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी एकमताने निवड - दिलीप वळसे पाटील यांनी मांडला प्रस्ताव; छगन भुजबळ यांनी दिले अनुमोदन, ठरावावर सर्व ४८ आमदारांची सही

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. विधानभवनात शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.


अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव गटनेतेपदासाठी सुचवले, तर या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यावर उपस्थित सर्व आमदारांनी समर्थन दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.


सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आणि विधानपरिषदेतील अशा एकूण ४८ आमदारांच्या सह्यांनी मंजूर करण्यात आला. या बैठकीत दोन ठराव मंजूर करण्यात आले असून, पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार त्यांची पक्षनेता म्हणून निवड करण्यास मान्यता देण्यात आली. या दोन्ही ठरावांना एकमताने संमती मिळाल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे आता पक्षाचे सर्वाधिकार आले आहेत.

खासदारकीचा दिला राजीनामा


गटनेतेपदी निवडीची अधिकृत पत्रे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधिमंडळ सचिवालयाकडे सादर केली. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला. सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान; मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद

मुंबई: मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने