Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाजवळ तीन प्रवासी धावत्या लोकलमधून रुळांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अफजल चौधरी, सचिन विश्वकर्मा आणि जेनिल सय्यद या तीन प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कुर्ला स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी धीमी लोकल पकडली होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या तिघांनाही आत शिरता आले नाही आणि त्यांना दारावरच लटकून प्रवास करावा लागला. गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच शीव स्थानकाजवळ गर्दीच्या रेट्यामुळे या तिघांचाही तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून थेट रुळांवर फेकले गेले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या अपघातामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



जखमींना तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अफजल चौधरी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. तर सचिन आणि जेनिल या दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी रेल्वे प्रशासनाला ओव्हरहेड वायरमधील (OHE) विद्युत पुरवठा काही काळ बंद करावा लागला. याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच गाड्या थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. जखमी प्रवाशांना रुळांवरून सुरक्षितपणे बाजूला केल्यानंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आणि लोकल वाहतूक धीम्या गतीने पूर्ववत करण्यात आली.



रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू


सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांचे दाराला लटकणे ही नेहमीचीच बाब झाली असली तरी, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गर्दीच्या रेट्यामुळे प्रवाशांचा तोल गेला असावा असे वाटत असले तरी, प्रवासात डब्यामध्ये प्रवाशांमध्ये काही वादावादी किंवा झटापट झाली होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. डब्यातील इतर प्रवाशांचे जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहेत. या तपासानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



मध्य, हार्बर रेल्वे विस्कळीत


एका बाजूला मध्य रेल्वेच्या कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांजवळ साचलेल्या कचऱ्याला सायंकाळच्या वेळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेला धूर आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास थांबवण्यात आली होती. दुसरीकडे, हार्बर रेल्वेवरही तांत्रिक बिघाडाने प्रवाशांची वाट अडवली. खांदेश्वर आणि मानसरोवर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील तब्बल चार सिग्नलमध्ये अचानक बिघाड झाला. या बिघाडामुळे लोकल गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्या आणि रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. घरी परतण्याच्या घाईत असलेल्या हजारो प्रवाशांना या दुहेरी संकटामुळे स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले.

Comments
Add Comment

चिवडा, वेफर्ससह कुरकुरीत पदार्थांच्या पॅकेजिंगवर बंदी आणा, भाजपा नगरसेविकेची मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई मोठ्या प्रमाणात कचरा होण्यास चिवडा,वेफर्स यांची वेष्टने ही कारणीभूत असतात. याचं

धर्मादाय रुग्णालयांसाठी केंद्र आणि राज्याच्या सरकारी आरोग्य योजना बंधनकारक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

राखीव निधीच्या विनियोगात पारदर्शकता आणण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार मुंबई : राज्यातील सर्व धर्मादाय

मुंबईतील काही परिसर फेरीवालामुक्त ठेवणारच; महापालिका आयुक्तांनी दिले तीव्र कारवाईचे निर्देश

मुंबई: मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे

मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्‍या विपुल दोशी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची यांची सोमवारी २३ फेब्रुवारी

तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी