रायबरेलीत राहुल, सोनिया, प्रियंका गांधींविरुद्ध तक्रार

रायबरेली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राहुल गांधींसोबत सोनिया गांधी व प्रियंका गांधी यांचेही नाव आहे. सरकारी जमिनीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.


पाजा फाउंडेशन या संस्थेने हा खटला दाखल केला आहे. सरकारी जमीन व तलावाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने इमारत बांधण्यात आली, असा दावा त्यांनी केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका शाळेसाठी मान्यता घेतल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गांधी कुटुंबाने मदत केल्याचे याचिकेत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने पोलिसांकडे सविस्तर अहवाल मागवला आहे.


या प्रकरणात गांधी कुटुंबासोबत जिल्हाधिकाऱ्यांसह ४५ लोकांनी मिळून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. आता ९ फेब्रुवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्व गांधी परिवार अडचणीत सापडला आहे.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य