'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे. यामुळेच हे पद अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी आमची इच्छा आहे. एकदा सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात इतर राजकीय प्रश्न सोडवता येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले.


दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याबाबत चर्चा सुरू होती का ? या प्रश्नावर पक्षाशी संबंधित सर्व राजकीय प्रश्न सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात सोडवता येतील असेच भुजबळ पुन्हा म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत पक्ष आग्रही आणि ठाम असल्याचे भुजबळ म्हणाले.


सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार किंवा कसे याबाबत मला कोणतीही माहिती नाही असे शरद पवारांनी सांगितले. या संदर्भात आत्ता मी बोलू शकत नाही. पण सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे ही माझ्या पक्षाची भूमिका मी पुन्हा एकदा आपल्यापुढे ठामपणे मांडेन असे छगन भुजबळ म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पक्षाच्या आमदारांची आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गटनेता या पदासाठी निवडीची प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर राज्यपालांकडे शपथविधीसाठी वेळ मागितला जाईल आणि लवकरच सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतील, असे सूत्रांकडून समजते.

Comments
Add Comment

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

PM Narendra Modi : इंस्टाग्रामवर मोदींचीच हवा! १०० दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा ओलांडणारे जगातले पहिले राजकारणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर १००

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली

IDFC FIRST Bank: बँकिंग क्षेत्रात ५९० कोटींचा घोटाळा; माजी मॅनेजरने बायकोच्या जोडीने मारला बँकेच्या तिजोरीवर डल्ला

मुंबई: बँकिंग क्षेत्रात सध्या एका मोठ्या घोटाळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड