DCM Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अल्प परिचय



मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्या सामाजिक, संस्थात्मक आणि राजकीय प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

कौटुंबिक व शैक्षणिक पार्श्वभूमी
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे झाला. त्यांचे वडील कै. बाजीराव पाटील आणि यांच्याकडे १३ गावची पाटीलकी होती. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी (बी.कॉम.) प्राप्त केली आहे. सुनेत्रा पवार या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी असून त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत.






सामाजिक व संस्थात्मक कार्य
- गेल्या २३ वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून बारामती परिसरात विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विकासाचे भक्कम जाळे उभे केले आहे.
- बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून त्यांनी ६ हजारांहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
- ‘एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एक लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण केले आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
- विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यासोबतच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच महिलांसाठी कर्करोग जनजागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत.


राजकीय कारकीर्द
- २५ जून २०२४ पासून त्या राज्यसभेच्या सदस्य (खासदार) म्हणून कार्यरत आहेत. आज त्यांनी या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- संसदेत त्यांनी शिक्षण, महिला, बालके, युवक व क्रीडा विषयक स्थायी समितीवर काम केले आहे.
- मेक्सिको येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला संसद सदस्य परिषदेत त्यांनी भारतीय संसदेचे प्रतिनिधित्व केले आहे.मिळालेले सन्मान
सुनेत्रा पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (२०२३), राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार (२०२४) आणि ग्रीन वॉरियर पुरस्कार यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती

मुंबई: ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या

महापौरांनी ओळखला भविष्यातील पाणी टंचाईचा धोका; सन २००९च्या धर्तीवर मुंबईतील सर्व विहिरी तपासा, तात्काळ वापरात आणा

मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची

Madhya Pradesh: अनुपपूरमध्ये मोठा अपघात; तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील अनुपपूर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेत एका

तुम्ही एसी आणि इंडक्शन एकाच वेळी वापरत असाल तर सावधान; तुम्हाला दंड होऊ शकतो

मुंबई: एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे लोकांनी आपल्या घरात इंडक्शन कुकटॉप वापरायला सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात

Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड