जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी '


मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत राजा पाटील यांनी अंमलात आणली. राजा राणी ट्रॅव्हल आणि महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासने संयुक्तरित्या त्याचे आयोजन केले होते. ते आजतागायत चालू आहे. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. सिमारेषांवरील सीमा सुरक्षा बलाच्या सैनिकांसाठी 'सलामी' या अभिनव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कडवी सैनिकी शिस्त, देशाप्रती असलेला आदर, कर्तव्य सारे काही यानिमित्ताने आठवायला लागते. घर, कुटुंबापासून दूर राहून प्राणपणाने देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची त्यागी वृत्ती या सैनिकांत ठासून भरलेली असते. मुंबईकरांनी सादर केलेल्या या कार्यक्रमांमध्ये त्या त्या विभागातील सैनिक सुद्धा उस्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला दाखवत असतात. मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांच्या आयोजनातून या वर्षी 'सलामी' हा उपक्रम १ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४८ कलावंत व तंत्रज्ञ यांच्यासोबत राजस्थान राज्यातील जोधपूर, पोकरण, जैसलमेर, ब्रम्हसर, रामगढ, बबलीयानवाला, खाजूवाला, सांचू, बिकानेर या सीमावर्ती भागातील सीमा सुरक्षा बलाच्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या करमणुकीकरीता संपन्न होणार आहे. या दोन्ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, सुनील शिंदे, महेश सावंत, नरेंद्र पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, हारून खान, सचिन अहिर, किसन जाधव, यशवंत जाधव, यशोधर फणसे, नाना आंबोले, अशोक सावंत, बाळा खोपडे, प्रदीप कडू, सुनिल हळूरकर, निखिल जाधव, जितेंद्र जाधव, शर्मिला जाधव, आर. अजिथ, विवेक देशपांडे, श्रीरंग आरस, नंदकिशोर राठी, मनोहर गोलांबरे, मारुती खुळे, महादेव खैरमोडे, रजनीश राणे, सुनिल चव्हाण, शाम नाबर, सिद्धार्थ तांबे, सुनिल मेहेतर, अनुप सुर्वे, मेघश्याम दिघोळे, तुषार काळे, केतन सरगे, जमील सिद्धीकी, सायली परब, समर्थ परब या सामाजिक जाणीव असलेल्या मंडळीचे सहकार्य लाभले आहे.



या संपूर्ण उपक्रमास गायिका माधुरी नारकर यांच्या स्वर्णस्वर फाऊंडेशन , डॉ. नितीन नांदगावकर यांची निमना फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. एकता मंचचे अध्यक्ष प्रिं. अजय कौल यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होत असलेल्या संकल्पनेसाठी कोमल दळवी व दिपमाला लादे या संकल्पना नियंत्रक असून या राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण संकल्पनेचे नियोजन व या धाडसी उपक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन डॉ. संतोष परब यांनी
केले आहे.

Comments
Add Comment

नालेसफाई कंत्राटदारांची थकीत रक्कम देण्यास प्रशासन तयार, कंत्राटदार कामाला करणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात आज