मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरु आहेत. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग परिसरातील पुनर्वसित इमारतींमधील घरांचे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २०२६ च्या एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर घरांचा ताबा दिला जाणार आहे.


मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या माध्यमातून या तीन ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३,६६६ सदनिका उभारण्याचे नियोजन असून, त्यापैकी सुमारे १,४०० हून अधिक घरे जवळपास पूर्ण झाली आहेत. यातील काही कुटुंबांना फेब्रुवारी अखेरीस घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत.


अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरातील ८६४ घरे आणि वरळीतील ५७४ घरे बांधकामाच्या दृष्टीने तयार असून, त्यांना आवश्यक निवासी प्रमाणपत्रेही प्राप्त झाली आहेत. पूर्वी काही तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे वितरण प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून घरांचा ताबा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.


वाटपाच्या वेळापत्रकानुसार, फेब्रुवारीमध्ये वरळी आणि नायगावमधील घरे वितरित केली जातील. त्यानंतर मार्चमध्ये वरळीतील आणखी घरे आणि एप्रिलमध्ये ना. म. जोशी मार्ग परिसरातील सदनिका रहिवाशांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे पहिल्या टप्प्यातील सर्व ३,६६६ कुटुंबांचे पुनर्वसन एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे.


वरळी


फेब्रुवारी ५७४
मार्च २८०
एकूण १७०८


नायगाव


फेब्रुवारी ८६४
मार्च २३७


ना. म. जोशी मार्ग


एप्रिल ५७७


एकूण घरे - ३६६६


बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पात्र रहिवाशांना सुमारे ५०० चौरस फुटांचे आधुनिक सदनिका देण्यात येत आहेत. आधीच वरळीतील काही रहिवाशांना या नव्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, उर्वरित कुटुंबे आता आपल्या हक्काच्या घरांची वाट बघत आहेत.


मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बीडीडी पुनर्विकास प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यांतील इमारतींची कामे जसजशी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित रहिवाशांनाही नव्या घरांचा ताबा देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Prajakta Lavangare : महिला आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी सुविधा देण्यासाठी उपाययोजना करा

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा, सुविधांचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या

MPSC Exam : MPSC परीक्षेत मोठा बदल, आता २१ दिवसांत निकाल येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा

Lokmanya Tilak road fire : लोकमान्य टिळक रोडवर आग; परिसरातील नागरिकांची पळापळ!

मुंबई : मुंबईत आगीच्या सत्रामुळे खळबळ उडाली असून, शुक्रवारी दादरच्या (Dadar) लोकमान्य टिळक रोडवर (Lokmanya Tilak Road) आगीची

Aarey Road : गोरेगाव आरे भास्कर रस्त्यांची तात्पुरती डागडुजी

स्थानिक नगरसेविकेने रस्ता खचण्याची वर्तवली भीती पावसाळ्यात पूर्वस्थितीत रस्ता आणून देताना घेतली नाही

Mumbai Police : मुंबई पोलीस अधिकारी संभाजी गुरव यांची मोठी कामगिरी; उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च डेनाली शिखर सर

मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संभाजी गुरव ( Sambhaji Gurav) यांनी उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च माउंट

Suicide News: धक्कादायक! वरळी सी लिंकवरून समुद्रात उडी; ठाण्यातील व्यावसायिकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वरळी सी लिंकवरून (Worli Sea Link) एका व्यक्तीने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.