धावपट्टीचे आधुनिकीकरण होण्यापूर्वीच काळाची दादांवर झडप

विमानतळावर आधुनिक यंत्रणा बसवण्याचे चार महिन्यांपूर्वीच निर्देश


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्याच्या विमानचालन क्षेत्राचा कायापालट करू इच्छिणारा एक द्रष्टा नेता गमावला आहे. अत्यंत विदारक बाब म्हणजे, ज्या बारामती विमानतळावर सुरक्षित लँडिंगसाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याचे निर्देश त्यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते, त्याच धावपट्टीच्या डागडूजीपूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.


ऑक्टोबर २०२५ मध्ये अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी बारामती विमानतळासह राज्यातील इतर छोट्या विमानतळांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता.


बारामतीत पूर्णविराम
बारामतीच्या विकासासाठी अजित पवारांनी आपली उभी हयात घालविली. अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरी सांभाळणाऱ्या अजित पवारांची अपघातामुळे अखेर बारामतीत झाली. ज्या परिसराच्या विकासासाठी परिश्रम केले, त्याच परिसरात अजित पवारांच्या कार्याला पूर्णविराम मिळाला आहे. अपघातामुळे बारामती शोकसागरात बुडाल्याचे दिवसभरात पाहावयास मिळाले.


अजित पवारांचे ‘व्हिजन’
बारामती, शिर्डी, यवतमाळ, धाराशिव व लातूर यांसारख्या छोट्या विमानतळांवर पार्किंग हब विकसित करण्याचे त्यांचे नियोजन होते. ‘छोट्या शहरांतूनही विमाने सुरक्षितपणे उडू शकली पाहिजेत, यासाठी त्यांनी रडार व आधुनिक सुरक्षा उपाययोजनांचे जाळे विणण्यास सुरुवात केली होती. राज्यातील विमानचालन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी 'फ्रेमवर्क' तयार केले होते, जेणेकरून पर्यटन आणि उद्योगाला मोठी गती मिळेल.


नशिबाचा खेळ
अजित पवारांना बारामती विमानतळ हे जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज करायचे होते. ‘यामुळे ग्रामीण भागातील कृषी निर्यात आणि गुंतवणूक वाढेल,’ असा विश्वास त्यांनी त्या बैठकीत व्यक्त केला होता. ज्या ‘सेफ लँडिंग’साठी ते आग्रही होते, तीच व्यवस्था पूर्णत्वास येण्यापूर्वीच बारामतीमध्ये त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. दादांनी पाहिलेले ‘उड्डाण महाराष्ट्राचे’ हे स्वप्न आता अधुरे राहिले असून, त्यांच्या निधनाने राज्याचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र