ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तर ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची बातमी समजताच त्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने, महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अद्याप शासनाकडून कोणतेही अधिकृत निर्देश न आल्याने निवडणूक वेळापत्रक कायम राहण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.


गेली तीन वर्षे रखडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत ५५ टक्के इतके मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्के कमी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी शरद पवार गट १२, राष्ट्रवादी अजित पवार गट ९, एमआयएम ५, शिवसेना उबाठा १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत.


ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा पार केला आहे. शिंदेची शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी युतीत निवडणूक लढविली असली तरी, शिंदेच्या शिवसेनेकडे सत्तास्थापनेइतका बहुमताचा आकडा असल्याने त्यांच्या पक्षाचा महापौर होईल, अशी शक्यता आहे.


मागील आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवगार्साठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिवसेना शिंदे गटातून सात जणांची नावे पुढे आली आहेत. या सातपैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच, महापौर पदासाठी ३ फेब्रुवारी रोजी निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी ३० जानेवारी रोजी अर्ज भरण्याची मुदत आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची घटना घडली.


यामुळे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शासनाकडून याबाबत कोणतेही निर्देश आलेले नसल्यामुळे या निवडणुका वेळेतच होण्याचा अंदाज प्रशासकीय सुत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच शासनाकडून निर्देश आले तर मग निवडणुका लांबणीवर पडू शकतात, असेही प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे