आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला

मुंबई : आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.

लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्याने जेलच्या मुख्य दाराजवळ मोकळ्या जागेत कर्तव्यावर असलेल्या अर्थात ड्युटी करत असलेल्या पोलिसांकडे बघत शिव्या देण्यास सुरुवात केली. वाघ नावाच्या पोलीस शिपायाने लोकेंद्रला गप्प बसण्यासाठी दरडावून बघितले तर लोकेंद्रने वाघ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई वाघ गंभीर जखमी झाले.

कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत हा पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला करत असल्याचे बघून इतर पोलीस घटनास्थळी धावले, त्यांनी लोकेंद्रला चोप दिला आणि ताळ्यावर आणले. यानंतर कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत याच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याबाबतचा गुन्हा नोंदवला. जखमी झालेल्या पोलीस शिपाई वाघ यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण ताज्या घटनेमुळे मुंबईचे आर्थर रोड कारागृह आता सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित झा
Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक